Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी)  09  ऑगस्ट 2023

0
38
Daily Current Affairs in Marathi
Daily Current Affairs in Marathi

Daily Current Affairs in Marathi: Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकतो. Current Affairs (चालू घडामोडी) च्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात. Daily Current Affairs in Marathi विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तरे देता येतात तेदेखील खूप कमी वेळात आणि तो वेळ आपल्याला दुसऱ्या प्रश्नांना वापरता येतो. म्हणून या विषयात (Daily Current Affairs in Marathi) चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्याला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.

चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा: भारताची उपांत्य फेरीत धडक

Daily Current Affairs in Marathi
Daily Current Affairs in Marathi
  • कमालीच्या वेगवान झालेल्या सामन्यातील अखेरच्या सत्रात प्रतिस्पर्धी दक्षिण कोरियाचा प्रतिकार मोडून काढत भारताने सोमवारी आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत ३-२ असा विजय मिळवून उपांत्य फेरीतील प्रवेशावर शिक्कामोर्तब केले.
  • भारत आतापर्यंत झालेल्या चार सामन्यांत अपराजित राहिला असून, तीन विजय आणि एका अनिर्णित सामन्यासह १० गुणांनी गुणतालिकेत आघाडीचे स्थान मिळवले आहे. भारताचा अखेरचा सामना बुधवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. अन्य एका सामन्यात मलेशियाने जपानचा ३-१ असा पराभव करून उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. 
  • कोरियाविरुद्ध सहाव्याच मिनिटाला निलकांत शर्माने मैदानी गोल करून भारताला आघाडीवर नेले. या पहिल्याच सत्रात किम सुंगह्युनने कोरियाला बरोबरी करून दिली. कोरियाला यानंतर गोलसाठी ५८व्या मिनिटाची वाट पाहावी लागली. यांग जिहुनने पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. त्यापूर्वी दुसऱ्या सत्रात हरमनप्रीत सिंगने कॉर्नरवर गोल करून भारताला आघाडीवर नेले. मध्यंतरानंतर मनदीपने उत्तरार्धाच्या सुरुवातीलाच ३३व्या मिनिटाला गोल करून भारताची आघाडी भक्कम केली. मात्र, सामन्यातील अखेरचे सत्र कमालीचे वेगवान झाले. यातही कोरियाच्या वेगवान चाली आणि काही वेळा धडकी भरवणारी आक्रमणे थोपवताना भारताच्या बचावफळीची कसोटी लागली.
  • सामन्याची अखेरची दहा मिनिटे श्वास रोखणारी ठरली. यामध्ये कोरियाने दहा पेनल्टी कॉर्नर मिळवले. त्यापैकी केवळ एकच त्यांना सत्कारणी लावता आला. भारताचा बचाव आणि गोलरक्षक श्रीजेशची भूमिका निर्णायक ठरली. या अखेरच्या मिनिटांच्या खेळात भारताला एक पेनल्टी कॉर्नर आणि एक पेनल्टी स्ट्रोक मिळाला. या स्ट्रोकवर कर्णधार हरमनप्रीतला गोल करण्यात अपयश आले. मात्र, बचाव फळीच्या निर्णायक कामगिरीने भारताचा विजय साकारला.

राज्यातील आठ कोटी नागरिकांना लाभ! ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

  • ‘शासन आपल्या दारी’ हा ऐतिहासिक प्रकारचा हा उपक्रम आहे. दीड कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी या उपक्रमात लाभ घेतला आहे. या उपक्रमांद्वारे जास्तीत जास्त नागरिकांना लाभ देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचे अधिकारी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे राज्यातील सात ते आठ कोटी नागरिकांना या उपक्रमांतर्गत लाभ मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.   
  • पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आदी या वेळी उपस्थित होते. 
  • ‘या उपक्रमांतर्गत राज्यातील दीड कोटीपेक्षा अधिक आणि पुणे जिल्ह्यातील २२ लाखांपेक्षा अधिक नागरिकांना विविध लाभ देण्यात आला आहे. सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी १५०० कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. १२ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी दिले आहेत. ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेनुसार राज्य शासनही सहा हजार रुपयांची भर घालणार असल्याने १२ हजार रुपये इतका वार्षिक लाभ पात्र शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे.
  • बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना राज्यात ७०० ठिकाणी सुरू केला आहे. पोटदुखी होणाऱ्यांना तेथे मोफत उपचार देण्यात येतील. केवळ राज्यातील नागरिकच नव्हे, तर राज्यातील विकास पाहून पोटात दुखणाऱ्यांसाठी देखील योजना आणल्या आहेत’, असा टोला विरोधकांचे नाव न घेता मुख्यमंत्री शिंदे यांनी या वेळी लगावला. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘शासनाच्या योजना लोकांच्या घरापर्यंत नेण्याचे काम शासनाने केले आहे. शेतकऱ्याला केवळ एक रुपयात पीक विमा सुविधा दिली आहे. ‘लेक लाडकी’ योजनेंतर्गत कुटुंब लखपती होईल अशी योजना सुरू केली आहे. महात्मा फुले जीवनदायी योजनेंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, अंगणवाडीसेविकांच्या मानधनात वाढ केली आहे.’ उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकारचे सहकार्य मिळत आहे. ८० हजार कोटींची कामे केंद्र सरकारच्या सहकार्याने होत आहेत. विकास प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही.

अलीगड: राम मंदिरासाठी ४०० किलोंचे कुलूप!

  • हाताने तयार करण्यात येणाऱ्या कुलपांसाठी प्रसिद्ध असलेल्या अलीगडमधील एका वयोवृद्ध कलाकाराने अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी ४०० किलोग्रॅम वजनाचे कुलूप तयार केले आहे. हे मंदिर पुढील वर्षी जानेवारीत भाविकांसाठी खुले होण्याची अपेक्षा आहे.श्रीराम मंदिराचा विचार करून शर्मा यांनी तयार केलेले कुलूप १० फूट उंच, साडेचार फूट रुंद आणि ९.५ इंच जाड असून, त्याला ४ फूट लांब किल्ली आहे.
  • हे कुलूप तयार करण्यासाठी त्यांना सुमारे दोन लाख रुपये खर्च आला आणि आपले स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी जन्मभराची मिळकत त्यासाठी लावली.‘जगातील सर्वात मोठे हस्तनिर्मित कुलूप’ तयार करण्यासाठी भगवान श्रीरामांचे निस्सीम भक्त असलेले सत्यप्रकाश शर्मा यांनी अनेक महिने परिश्रम घेतले.
  • या वर्षीच हे कुलूप भेट म्हणून राम मंदिराच्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्याचा त्यांचा मनोदय आहे.हे कुलूप कुठे वापरले जाऊ शकते हे आम्हाला पाहावे लागेल, असे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

चांद्रयान ३ चंद्राच्या आणखी जवळ पोहचलं, ९ ऑगस्टला पुढील कक्षेत प्रवेश करणार

  • चांद्रयान ३ ही भारताची महत्वकांक्षी मोहीम आहे. याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलं आहे. शनिवारी चांद्रयानाने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. चांद्रयान चंद्राभोवतीच्या १७०x४३१३ या कक्षेत फिरत आहे. ९ ऑगस्टला चांद्रयान पुढील कक्षेत प्रवेश करेल, अशी माहिती इस्रोने दिली आहे.
  • १४ जुलैला इस्रोच्या चांद्रयान ३ ने चंद्राकडे झेपावलं होतं. पृथ्वीच्या कक्षेत फेरीत मारल्यानंतर ५ ऑगस्टला चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. ९ ऑगस्टला चांद्रयान आणखी आतल्या कक्षेत ढकललं जाईल. १७ ऑगस्टला चांद्रयान चंद्रापासून १०० किलोमीर उंचीवर स्थिरावेल. नंतर २३ ऑगस्टला चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न करणार आहे.
  • दरम्यान, इस्रोने रविवारी चांद्रायानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत चंद्रावरील पृष्ठभाग स्पष्टपणे दिसत आहे. चांद्रयान ३ ही भारताची चंद्राच्या अध्ययनासाठी पाठवलेली तिसरी मोठी मोहीम आहे. यापूर्वी पहिल्या मोहीमेत यश आलं होतं. तर दुसऱ्या मोहीमेत विक्रम लँडरचा अपघात झाल्याने अपयश आलं होतं.

लोभस आणि सुंदर! चंद्राच्या कक्षेत पोहचल्यानंतर चांद्रयानाने पाठवला पहिला फोटो

  • भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) चांद्रयान ३ या तिसऱ्या मानवविरहीत चांद्रयानाने घेतलेला चंद्राचा पहिला फोटो जारी केला आहे. चांद्रयान ३ हे शनिवारी चंद्राच्या कक्षेत पोहचलं. त्यानंतर आता इस्रोने चंद्राचा पहिला फोटो आणि एक छोटासा व्हिडीओ पोस्ट केला आहे. आता अपेक्षा अशी आहे की चांद्रयान ३ या महिन्याच्या २३ तारखेपर्यंत चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करेल.
  • शनिवारी म्हणजेच ५ ऑगस्टच्या दिवशी चांद्रयान ३ ने चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश केला. पृथ्वीपासून तीन लाख किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर यानाला चंद्राच्या स्थिर कक्षेत आणलं आहे. १४ जुलै २०२३ रोजी सतीश धवन स्पेस सेंटरमधून LVM-3 रॉकेटच्या साह्याने चांद्रयान-3चं प्रक्षेपण झालं होतं. आता या यानाने पृथ्वी आणि चंद्रामधील अंतराळातील तीन लाख किलोमीटर अंतर व्यापलं आहे. या यानाने १ ऑगस्ट रोजी पृथ्वीभोवती आपली प्रदक्षिणा पूर्ण केली होती आणि चंद्राच्या दिशेने आपला ट्रान्स-लूनर प्रवास सुरू केला होता.
  • १ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास चांद्रयान-3 पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या दिशेने पाठवण्यात आले. याला ट्रान्सलुनर इंजेक्शन म्हणतात. यापूर्वी, चांद्रयान अशा लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत होते. २३ ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरेल.
  • चांद्रयान-३ मध्ये लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूल आहे. लँडर आणि रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरतील आणि तेथे १४ दिवस प्रयोग करतील. प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेत राहून पृथ्वीवरून येणाऱ्या रेडिएशनचा अभ्यास करेल. या मोहिमेद्वारे इस्रो चंद्राच्या पृष्ठभागावर भूकंप कसे होतात हे शोधून काढणार आहे. चंद्राच्या मातीचाही अभ्यास करणार आहे.