Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी)  1 सप्टेंबर 2023

0
23
Daily Current Affairs in Marathi
Daily Current Affairs in Marathi

Daily Current Affairs in Marathi: Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकतो. Current Affairs (चालू घडामोडी) च्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात. Daily Current Affairs in

रेल्वे स्थानकांवरही ‘एटीएम’! होय; महाराष्ट्रातील ‘या’ रेल्वेस्थानकांवर प्रवाशांसाठी ‘एटीएम’ची सुविधा

Daily Current Affairs in Marathi
Daily Current Affairs in Marathi
  • सध्याचे युग मोबाईलचे आहे. मोबाईलद्वारेच बहुतांश आर्थिक व्‍यवहार होत असल्‍याने जादा रोख रक्कम सहसा कोणी जवळ बाळगत नाही. रेल्वेत प्रवास करताना मात्र रोख रक्कमेची गरज भासते. अनेक रेल्वे प्रवाशांकडे रोख रक्कम नसल्याने त्यांची गैरसोय होते. यामुळे रेल्वे प्रशासनाने बडनेरा, अकोला, शेगावसह मध्‍य रेल्‍वेच्‍या भुसावळ विभागातील १३ रेल्वे स्थानकांवर ‘एटीएम’ बसविण्याचा निर्णय घेतला आहे. हिताची सर्व्हिसेस लि. या कंपनीसोबत रेल्‍वेने या सेवेसाठी ५ वर्षांचा करार केला आहे.
  • शेगाव, अकोला, मलकापूर, पाचोरा, बडनेरा, नाशिक, भुसावळ, चाळीसगाव, मनमाड, निफाड, देवळाली, लासलगाव आणि खंडवा या स्‍थानकांवर ‘एटीएम’ची सुविधा उपलब्‍ध होणार आहे. यातून रेल्वेला ११.४१ लाख रुपयांचा महसूलही मिळणार आहे. प्रवाशांना अचानक रोख रकमेची गरज भासल्यास गैरसोय होते.
  • रेल्वे प्रवासात अनेकवेळा ऑनलाइन पैसे देताना अडचणी येतात. त्यामुळे रोख रकमेची गरज पडते. यासाठी प्रवाशांकडून एटीएमचा शोध घेतला जातो. प्रामुख्याने तिकीट खिडकीचा परिसर, प्रवेशद्वार, जनरल वेटिंग हॉल या भागात एटीएम लावण्यावर भर असणार आहे. यामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकावरही एटीएममधून पैसे काढून गरज भागविता येणार आहे.

‘इंडिया’ आघाडीच्या बिकट वाटेची माध्यमांत चर्चा

  • ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीबद्दल असलेल्या उत्सुकतेचे प्रतिबिंब देशभरातील माध्यमांत उमटले आहे. भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीपुढे आव्हान उभ्या केलेल्या विरोधकांच्या या आघाडीचा चेहरा कोण असेल इथपासून तर प्रत्यक्षात ही आघाडी कितपत व्यवहार्य ठरेल, अशा प्रश्नांचा उहापोह प्रमुख प्रादेशिक, राष्ट्रीय वर्तमानपत्रे करीत आहेत.
  • बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या पुढाकाराने पाटण्यात झालेली पहिली बैठक आणि नंतर काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकच्या राजधानी बंगळुरूमधील बैठकीनंतर इंडिया आघाडीचे पंख विस्तारत चालले आहेत. आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाराष्ट्रातील संभाव्य राजकीय करिश्म्यावर भिस्त ठेवत विरोधकांची ही आघाडी मुंबईत आपली रणनिती धारदार करण्याचा प्रयत्न करील, असे मानले जाते. आज, जागरण डॉट कॉमने उद्धव ठाकरे यांच्या छायाचित्रासह शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातील संपादकीयाचे वृत्त दिले आहे. भाजपने चंद्रयान वापरून प्रचार केला तरी, तो कमी पडेल, आगामी लोकसभा निवडणुकीत त्याचा उपयोग होणार नाही, भाजपचा पराभव अटळ आहे. भाजपने तर हेलिकॉप्टर आणि इव्हीएम बुक करून मुदतपूर्व निवडणुकीची तयारी चालविली आहे, असा या लेखाचा गोषवारा जागरणच्या बातमीत दिला आहे.
  • दैनिक भास्करने बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॉनर्जी आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी गॉस सिलिंडरच्या दरकपातीवरून केंद्रावर केलेल्या टीकात्मक विधानाचे शिर्षक करून बातमी दिली आहे. विरोधकांच्या आघाडीच्या दबावामुळे केंद्राने गॉस दरात कपात केली, आता आमच्या बैठका जसजशा होतील, तसे तसे आणखी कोणत्या वस्तूंचे भाव कमी होतील, ते पाहाच, असे या नेत्यांनी म्हटले आहे.
  • प्रभात खबर या दैनिकाने लालूप्रसाद आणि तेजस्वी यादव मुंबईत पोहोचल्याचे वृत्त ठळकपणे दिले आहे. शरद पवार बैठकीच्या तयारीत गुंतले असल्याचेही त्यात ठळकपणे नमूद केले आहे. मुंबईतील बैठकीत विरोधकांचा पंतप्रधानपदाचा चेहरा ठरणार काय, याचा उहापोहही अन्य एका बातमीत करण्यात आला आहे. लालूप्रसाद यांनी म्हटले आहे की, या वेळी पुन्हा मोदी येणार नाहीत. त्यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी आम्ही जात आहोत. पण, विरोधी आघाडीचा चेहरा बनण्याचा नितीशकुमार यांचा मार्ग सोपा नाही, असेही त्यांनी मान्य केल्याचे, या वर्तमानपत्राने म्हटले आहे. तर, हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या बातमीत, नितीशकुमार हे स्वत:च ‘इंडिया’चे समन्वयक बनण्यास तयार नसून अन्य कोणावर ही जबाबदारी सोपवू इच्छितात, असे त्यांचे वक्तव्य छापून आले आहे.

कर्नाटकमध्ये महिलांना दर महिन्याला दोन हजार रुपयांची मदत; ‘गृहलक्ष्मी’ योजना सुरू

  • निवडणूक जाहीरनाम्यातील आणखी एका आश्वासनाची पूर्तता करताना कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने बुधवारी ‘गृहलक्ष्मी’ योजना सुरू केली. यानुसार राज्यातील सुमारे १.१ कोटी महिलांना दर महिन्याला २ हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे.
  • काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी, मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या उपस्थितीत महाराजा महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमात ‘गृहलक्ष्मी’ची सुरुवात करण्यात आली. काँग्रेसने निवडणुकीपूर्वी दिलेल्या पाच प्रमुख हमी योजनांपैकी ही एक आहे. काँग्रेसने मे महिन्यात कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करून राज्यात सत्ता स्थापन केली. सिद्धरामय्या यांनी सांगिले की, काँग्रेस सरकारने पाच हमी योजनांपैकी शक्ती, गृहज्योती आणि अन्न भाग्य या तीन योजना याआधीच सुरू केल्या आहेत. ‘गृहलक्ष्मी’ ही चौथी योजना आहे.
  • ‘गृहलक्ष्मी’ योजनेसाठी सरकारने चालू अर्थसंकल्पात १७५०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. पाचवी हमी योजना ही युवा निधी आहे. ती डिसेंबरमध्ये सुरू करण्यात येणार आहे.

कर्नाटकमधील कामाची देशभरात पुनरावृत्ती- राहुल गांधी

  • कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या प्रमुख आश्वासनांची काँग्रेसने पूर्तता केली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सरकारने केलेल्या कामांची आता देशात पुनरावृत्ती करण्यात येईल, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सांगितले. आम्ही आमच्या आश्वासनांवर ठाम आहोत. आम्ही कधीही खोटे आश्वासन देत नाही, असेही ते म्हणाले.

80 टक्के भारतीयांची मोदींना पसंती; ‘प्यू रीसर्च सेंटर’च्या सर्वेक्षणातील निष्कर्ष

  • सुमारे ८० टक्के भारतीयांचा दृष्टिकोन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी सकारात्मक असून अलीकडच्या काळात देश अधिक शक्तिशाली झाल्याचे १०पैकी सात भारतीयांना वाटत असल्याचे समोर आले आहे. ही माहिती ‘प्यू रिसर्च सेंटर’ या अमेरिकास्थित संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे.
  • दिल्लीमध्ये पुढील महिन्यात होऊ घातलेल्या जी-२० शिखर परिषदेपूर्वी जगभरात केलेल्या या सर्वेक्षणाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार जगभरात भारताबाबत सकारात्मक मानसिकता असल्याचे समोर आले आहे. जगभरात सरासरी ४६ टक्के नागरिकांचे मत भारतासाठी अनुकूल असून त्या तुलनेत ३४ टक्के जग प्रतिकूल आहे. १६ टक्के लोकांनी कोणतेही मत नोंदविलेले नाही. यामध्ये इस्रायलमध्ये भारताबाबत सर्वात चांगले मत असून तेथील तब्बल ७१ टक्के नागरिक हे भारताची भूमिका अधिक व्यापक झाल्याचे मानतात.
  • ‘प्यू रिसर्च सेंटर’ने फेब्रुवारी २०२० ते मे २०२२ या काळात २४ देशांमध्ये हे सर्वेक्षण केले. यामध्ये ३० हजार ८६१ जणांनी सहभाग नोंदविला. भारतामध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार १०पैकी आठ नागरिकांच्या भूमिका मोदींबाबत सकारात्मक असून यातील ५५ टक्के लोकांनी ‘अतिशय सकारात्मक’ असल्याचे मत नोंदविले आहे. मोदींबाबत नकारात्मक मते असलेल्यांचे प्रमाण २० टक्क्यांच्या आसपास असल्याचे या सर्वेक्षणात आढळले आहे.

पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त देशभर ‘सेवा पंधरवडा’ कार्यक्रम

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त या वर्षीही देशभर ‘सेवा पंधरवडा’ कार्यक्रम आयोजित केला जाणार असून त्याचा वापर भाजपच्या कार्यकर्त्यांना आगामी लोकसभा निवडणूक आणि पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये सक्रिय करण्यासाठी केला जाणार आहे.
  • ‘सेवा पंधरवडय़ा’च्या आखणीसाठी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी महासचिवांची महत्त्वाची बैठक घेतली. त्यानंतर नड्डा यांनी बुधवारी लोकसभा व राज्यसभेतील भाजपच्या खासदारांशीही संवाद साधल्याचे समजते. दरवर्षी मोदींच्या वाढदिवसापासून (१७ सप्टेंबर) गांधी जयंतीपर्यंत ‘सेवा पंधरवडा’ या कार्यक्रमाअंतर्गत विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. या वर्षी ‘सेवा ही संघटना’ या उपक्रमामध्ये गावागावांमधील भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकांच्या दृष्टीने अधिक सक्रिय केले जाणार आहे. केंद्र सरकारच्या लोककल्याणाच्या योजना लाभार्थीपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्याच्या सूचना पक्ष कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत.

काय करणार?

  • * आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदारांना गावा-गावांमध्ये जाऊन लोकसंपर्काचे काम देण्यात आले आहे.
  • * भाजपने ३० जुलैपासून सुरू केलेल्या ‘मेरी माटी मेरा देश’ या कार्यक्रमाचा आढावा नड्डांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. स्वातंत्र्यलढय़ात वीरमरण प्रत्करणाऱ्या शूर स्वातंत्र्यसैनिकांच्या सन्मानार्थ कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. ‘सेवा पंधरवडय़ा’त या मोहिमेवरही चर्चा केली जाणार आहे.
  • * भाजपच्या भविष्यकालीन योजनांची माहितीही लोकांपर्यत पोहोचवली जाणार आहे.
  • * देशभर रक्तदान शिबीर, आरोग्य शिबिरे घेण्याचे आदेशही स्थानिक लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. देशभर स्वच्छता मोहिमेला पुन्हा गती दिली जाईल.
  • * जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये विविध प्रकारची प्रदर्शने भरवली जातील.