तरुणांनो लागा तयारीला!! राज्य पोलीस दलातील 20 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार | Police Bharti 2022
Maharashtra Police Bharti 2022
Police Bharti 2022 Maharashtra New Update
पोलीस भरती (Maharashtra Police Recruitment 2022) कधी होणार? याकडे डोळे लावून बसलेल्या तरुण-तरुणींसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात पाठीमागील दोन वर्षांपासून रखडलेली पोलीस भरती (Police Recruitment) लवकरच राबवली जाणार आहे. राज्य पोलीस दलातील 20 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे.
यामुळे 20 हजार पोलीस शिपायांचे पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सद्यस्थितीत पोलीस दलातील 7 हजार 231 पदे भरण्याची कार्यवाही शासनाच्या मंजुरीमुळे सुरु झाली आहे. या व्यतिरिक्त 2021 मध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई या संवर्गातील एकूण 11,443 पदे उपलब्ध झाली आहेत. 2020 आणि 2021 या वर्षातील रिक्त पदे एकत्रितरित्या भरण्याची कार्यवाही झाल्यास पद भरती यंत्रणेवरील ताणही कमी करता येईल, यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
अन्य महत्वाच्या भरती
✅12 वी उत्तीर्णांना दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मध्ये नोकरीZP Bhandara Bharti 2022ची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा | SECR Nagpur Bharti 2022!!
✅Kalsekar Technical Campus Mumbai Bharti 2022!!
✅Marathwada Mitra Mandal Pune Bharti 2022!!
✅10 वी, 12 वी उत्तीर्णांना HQ दक्षिणी कमांड पुणे येथे नोकरीची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा | HQ Southern Command Pune Bharti 2022!!
✅Shyamkishor Pashine College Gondia Bharti 2022
Police Bharti 2022 Maharashtra New Update
प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती सोमवारी (26 सप्टेंबर) दिली. पाठिमागील दोन वर्षे राज्यात कोरोना महामारीचा उद्रेक पाहायला मिळाला होता. या काळात लॉकडाऊन आणि इतर सर्वच यंत्रणा ठप्प झाल्या होत्या. परिणामी पोलीस भरतीही रखडली होती. देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुण आम्ही एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हा निर्णय पोलीस भरती संदर्भातील आहे. दोन वर्षे पोलीस भरती रखडली होती. त्यामुळे दोन वर्षांची पोलीस भरती आम्ही घेणार आहोत. त्यामधये 20 हजार पदे भरली जातील, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Police Recruitment 2022
- दरम्यान, पोलीस भरती संदर्भात एक जाहीरात निघाली आहे. ही जाहीरात साडेसात ते आठ हजार पदांसाठी आहे.
- आता नव्या भरतीबाबतही आम्ही लवकरच जाहीरात काढणार आहोत.
- त्यामुळे राज्यातील तरुणांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होईल, असे आम्हाला वाटते.
- राज्यातील अधिकाधिक तरुण या भरतीसाठी प्रयत्न करतील, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
- राज्यातील बेरोजगार तरुणांची संख्या मोठी आहे. हे तरुण चांगले शिक्षित आहेत.
- अशा वेळी त्यांच्या हाताला काम नसल्याने ते बेकार असल्याचे पाहायला मिळते.
- अशा वेळी जर पोलीस भरती निघाली तर अनेकांच्या हाताला काम आणि कुटुंबांचे जीवनमान उंचाविण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे.
- त्यामुळे राज्यातील जनतेसाठी ही भरती दिलासादायक असेल असे बोलले जात आहे.
- दरम्यान, राज्यात महाविकासआघाडी सरकार असतानाच पोलीस भरतीसंदर्भात हालचाली झाल्या होत्या.
- मात्र, नेमक्या वेळी राज्यावर कोरोना महामारीचे मोठे संकट आले.
- परिणामी सर्व यंत्रणाच ठप्प झाली किंवा त्याला मर्यादा आल्या.
- त्यामुळे पोलीस भरती रखडली.
- कोरोना महामारी आली नसती तर राज्यात या आधीच पोलीस भरती झाली असते, असेही सांगितले जाते.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.