महात्मा ज्योतीबा फुले ( १८२७-१८९० )

0
683

महात्मा ज्योतीबा फुले ( १८२७-१८९० ) 

जन्म : ११ एप्रिल १८२७ , पुणे 

मृत्यू : २८ नोव्हेंबर १८९० 

नाव : ज्योतीबा गोविंदराव फुले 

मुळ गाव : कटगुण , ता . सटाव , जि . सातारा 

आई : चिमणाबाई 

वडिल : गोविंदराव 

• मुळ नाव गोव्हे होते , परंतु वडिलांच्या फूलांच्या व्यवसायावरून फुले पडले . 

• एक वर्षाचे असताना आईचे निधन . १८३४ वडिल गोविंदरावांनी ज्योतीबांना मराठी शाळेत घातले . 

• १८३८ ब्राह्मणांच्या सल्ल्यावरून गोविंदरावांनी बागकाम शिकवण्यासाठी ज्योतीबांना शाळेतून काढले . ( ४ वर्षात मराठी शिक्षण पूर्ण केले ) 

• ज्योतीबांचे शिक्षण परत सुरु करण्यास आग्रह करणारे दोन व्यक्ती – १ ) गफ्फार बेग मुन्शी २ ) खिस्ती धर्मोपदेशक मि . लिजिट साहेब .

• १८४० वयाच्या १३ व्या वर्षी ७ वर्षाच्या सावित्रीबाईशी विवाह . १८४१-४७ स्कॉटिश मिशनरी शाळेत शिक्षण . 

• १८४८ लहुजीबूवा साळवे ( मांग ) यांकडे दांडपट्टा व नेमबाजीचे शिक्षण , 

• सगूणाबाई ( गोविंदरावांची मानलेली बहीण ) आई वारल्यानंतर त्यांचा सांभाळ केला . 

• ज्योतीबांच्या विचारावर प्रभाव पाडणारे ग्रंथ : १ ) राईट ऑफ द मॅन – थॉमस पेन २ ) वस्रसूची – संस्कृत ३ ) विप्रमती – कबीर 

सामाजिक कार्य : 

• ३ जुलै १८४८ मूलींची पहिली शाळा , बुधवारपेठ – पुणे ( तात्यासाहेब भीडेंचा वाडा ) 

• मूलींची पहिली शाळा सुरू करण्यासाठी मिस फरार यांच्याकडून प्रेरणा . 

• शाळेतील पहिल्या ६ विद्यार्थिनी १ ) सूमती मोकाशी २ ) दूर्गा देशमूख ३ ) माधवी थत्ते ४ ) सोनू पवार ५ ) जनी करडीले . 

• १८४९ सावित्रीबाईंना शिकवल्याबद्दल घराबाहेर काढले . ३ जुलै १८५१ परत शाळा सुरु केली , बुधवारपेठ – पुणे ( अण्णासाहेब चिपळूणकर वाडा ) 

• १८५१ अस्पृश्यांसाठी पहिली शाळा – नानासाहेब पेठेत 

• १७ सप्टेंबर १८५१ रास्तापेठेत मूलींची दूसरी शाळा 

• १५ मार्च १८५२ वेताळ पेठेत मूलींची तिसरी शाळा , 

• १९ मे १८५२ अस्पृश्यांसाठी शाळा , वेताळपेठ – पुणे ( सदाशिव बल्लाळ गोवंडे यांचा वाडा ) 

• १८४८ मराठी जातींच्या मूलांसाठी स्वतंत्र शाळा – बुधवारपेठ ( जगन्नाथ सदाशिव हाटे व सदाशिव बल्लाळ गोवंडे यांच्या मदतीने ) 

• १८४ ९ अल्हादाचे घर , नायगाव , शिरवळ , तळेगाव , शिरुर येथे शाळा . 

• १६ नोव्हेंबर १८५२ मुंबई प्रांत गव्हर्नर मेजर कॅन्डीतर्फे पुरस्कार विश्रामबाग वाडा . ( स्त्री शिक्षणाच्या कार्याबद्दल ) 

• १८५२ दलितांसाठी पहिले वाचनालय सुरू केले . 

• १० सप्टेंबर १८५३ महार , मांग लोकास विद्या शिकवण्याकरिता मंडळी संस्था काढली .

• १८५४ स्कॉटीश मिशनऱ्यांच्या शाळेत अर्धवेळ पगारी शिक्षक म्हणुन नोकरी . 

• १८५५ तुकाराम तात्या पडवळ यांच्या जातीभेद विवेकसाराच्या द्वितीय आवृत्तीचे उद्घाटन केले . 

• १८५५ प्रौढ स्त्री – पुरुषांसाठी रात्रीची शाळा सुरू केली . 

• १८५५ तृतीय रत्न – पहिले नाटक लिहीले . 

• १८५६ सनातनी ब्राह्मणांनी धोंडीराम महादेव कुंभार व सज्जन रोडे यांना फूलेंना मारण्याची १००० / – सुपारी दिली . 

• १८५६ फूलेंना संपविण्याची सुपारी घेतलेले रोडे हे अंगरक्षक बनले तर धोंडीबा कुंभार सत्यशोधक समाजाचे आधरस्तंभ बनले . 

• १८५७ च्या उठावास – १ ) भट पंडयांचे बंड २ ) फोर्तृशी चपाती बंड अशा शब्दात गौरव केला . 

• १८६३ बालहत्त्या प्रतिबंधक गृह स्थापना – पंढरपूर 

• १८६४ पहिला पूनर्विवाह -८ मार्च १८६४ गोखलेंच्या बागेत शेणवी जातीतील १८ वर्षाच्या विधवेचा पूनर्विवाह झाला . 

• १८६५ केशवपणाची प्रथा बंद करण्यासाठी नाव्यांचा संप – तळेगाव , ढमढेरे 

• १८६७ रायगडावरती शिवाजी महाराजांची समाधी शोधून जीर्णोद्धार केले व समाधीची व्यवस्था सरकारने स्वत : कडे घ्यावी असा अर्ज . 

• १८६८ अस्पृश्यांसाठी स्वत : ची विहीर दिली . गोंविदराव यांचे निधन झाले . ( १८६८ ) 

• १८६९ : १ ) ब्राह्मणांचे कसब हा ग्रंथ लिहिला . प्रस्तावना बाबा पद्मनजी यांनी लिहिली . २ ) शिवाजी महाराजांचा पोवाडा – यात स्वत : चा उल्लेख कूळवाडी भूषण असा केला . ३ ) अखंडवादी काव्यरचना . १८७३ गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला ( प्रश्नोत्तराच्या स्वरूपात ) 

• २४ सप्टेंबर १८७३ – सत्यशोधक समाजाची स्थापना – पुणे ब्रिद वाक्य – सर्वसाक्ष जगत्पती । त्याला नकोच मध्यस्थी । 

• या समाजाच्या पद्धतीने पहिला विवाह – २५ डिसेंबर १८७३ ( सिताराम आल्हाट व राधाबाई निंबकर ) 

• १८७३ : १ ) मजुरांना बोनस मिळण्याची प्रथा सुरू २ ) अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामा प्रसिद्ध ३ ) काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवेची १८६५ मध्ये प्रसूती झाली , तिच्या मुलाला १८७३ मध्ये दत्तक घेतले . ५ जून १८७५ न्या . रानडे यांनी ज्योतीबा फुलेंच्या सहकार्याने पुण्यात स्वामी दयानंद यांची हत्तीवरून मिरवणूक काढली .

• १८७७ सक्तीच्या शिक्षणाचा ठराव मांडला . व्हिक्टोरिया अनाथ आश्रम सुरू केले . दिनबंधू वृत्त सुरू केले . दुष्काळ पिडीतांना मदत करण्यास पुढाकार , १८ जुलै १८८० : मद्यपानास विरोध पुण्यातील मद्यपानगृहात वाढ करण्याच्या सरकारी धोरणास विरोध करणारे पत्र पुणे नगर पालिकेच्या कार्यकारी मंडळ अध्यक्षाला लिहिले . – पालिकेला दारू गुत्त्यांवर कर बसविण्यास सांगितले . 

• १८८० नारायण मे . लोखंडे यांनी बॉम्बे मिल असोसिएशनची स्थापना केली .

• १६ नोव्हेंबर १८८२ स्त्री शिक्षणाचे आद्यजनक म्हणून ब्रिटिश सरकारने गौरव केला . १८७६-१८८२ पुणे नगरपालिकेचे सदस्य होते . 

• ३ फेब्रुवारी १८८२ विल्यम हंटर अध्यक्षतेत आयोग नियुक्त केला . 

• १९ ऑक्टोबर १८८२ हंटर आयोगाला शिक्षणाच्या बाबतीत सविस्तर निवेदन . 

• जुलै १८८८ अर्धांगवायूचा झटका आला . ( डॉ.विश्राम रामजी घोले यांनी उपचार केला ) . १८८३ : १ ) अस्पृश्यांची कैफीयत ग्रंथ लिहिला २ ) शेतकऱ्यांचा असूड 

• १८८५ सुधारणेचे झाड हे चित्र तयार करून हजारो प्रती शेतकऱ्यांना फूकट वाटल्या . 

• १८८५ : १ ) इशारा पुस्तक लिहिले . २ ) सत्सार १ , २ – ब्राह्मो व प्रार्थना समाजावरील टिका 

• १९ जुलै १८८७ स्वत : चे मृत्यूपत्र तयार केले . 

• २ मार्च १८८८ व्हिक्टोरिया राणीचा पूत्र ड्यूक कॅनॉट यांना प्राथमिक शिक्षण देण्याची मागणी . दिनबंधू – वृत्तपत्र मे १८८८ मुंबई मांडवी , कोळीवाडा हॉलमध्ये त्यांना लोकांनी महात्मा पदवी दिली . 

• १ एप्रिल १८८९ खतपोडीचे बंड हा ग्रंथ पूर्ण केला . 

• १८८९ पोवाडा विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी चे प्रकाशन केले . 

• मुंबई काँग्रेसच्या ५ व्या अधिवेशनात सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावर ३० फूट गवताचा शेतकऱ्याचा पूतळा तयार केला . 

• १८८९ राष्ट्रीय सभेत शेतकऱ्यांना समावून घेण्याचा अधिकार मागितला .

• १८८९ सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ लिहिला .

• २८ नोव्हेंबर १८९० मृत्यू झाला . 

• ३ डिसेंबर २००३ संसदेच्या प्रारंगणात फूलेंच्या पूर्णाकृती पूतळ्याचे अनावरण करण्यात आले . 

• फूलेंच्या मते शेतकऱ्यांचे ३ शत्रू – १ ) भिक्षुकशाही , २ ) नोकरशाही , ३ ) सावकारशाही 

ज्योतिबांविषयीचे गौरव : 

१ ) राजर्षी शाहू – महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग 

२ ) महर्षी वि . रा . शिंदे – १ ) पतितांचा पालनवाला २ ) अद्य दलितोद्धारक 

३ ) सयाजीराव गायकवाड – हिंदूस्थानचा वॉशिंग्टन 

४ ) लक्ष्मणशास्त्री जोशी – महात्मा फूले हे सामाजिक गुलामगिरी विरूद्ध बंड करणारे पहिले पुरुष . 

५ ) डॉ . बाबासाहेब आंबेडकर – त्यांना Who were the Shudras ? हा ग्रंथ फूलेंना अर्पण केला . 

६ ) रा . पंढरीनाथ पाटील – महाराष्ट्रातील पहिला सोशलिस्ट 

७ ) महर्षी शिंदे – रानफळाची उपमा 

८ ) माधव बागल – कार्लमार्क्स महाराष्ट्राचे 

९ ) महात्मा गांधी खरे महात्मा ज्योतीबा फूले आहेत . 

१० ) वि . रा . शिंदे – ज्योतीबा फूले हे रशियन क्रांतीपूर्वीचे पहिले कम्यूनिस्ट होते . रशियन क्रांतीकारक व ज्योतीबांत फरक एवढाच की , एकात अंत : श्रद्धा होती तर एकीकडे बाह्यभूक होती . 

११ ) लक्ष्मणशास्त्री जोशी – हिंदू समाजातील बहूजन समाजाला जागृत व आत्मावलोकन करायला लागणारा पहिला माणूस . 

१२ ) धनंजय किर – ( म . फूलेंचे परिपत्रकार ) ज्योतीबांचे नाव ज्योती आणि ज्योती म्हणजे ज्या ज्योतीने समता , मानवता , विवेकवाद यावर प्रकाश टाकून राष्ट्रास खरा मार्ग दाखविला . 

१३ ) धनंजय किर व स . ग . मालशे

१ ) महात्मा फूले समग्र वाङमय 

२ ) भारतीय समाजक्रांतीचे जनक 

३ ) भारतीय सामान्य जनतेच्या नवयुगाचा प्रेशीत सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक म्हणजे सत्यशोधक समाजाचे बायबल होय . 

महात्मा फूलेंचे संदेश –

१ ) ज्योतीने ज्योत लावा , एक निरक्षर साक्षर करा . 

२ ) श्वान हिच शक्ती , शहाणपणाचे अंती सर्व आहे .

 सरकारवर टिका करताना : प्रजेचे हीत पहात नाही तो राजा कसला ? पंडिता रमाबाईंचा गौरव : 

१ ) सत्शील २ ) सत्याशोधक साध्विनी फूलचे समकालीन टिकाकार : विष्णुशास्त्री चिपळूनकर – शूद्र जगद्गुरू व क्षुद्र धर्मसंस्थापक 

ब्रिटीश सरकारने दक्षिणा प्राईज फंडद्वारे म . फुलेंच्या शिक्षण कार्यासाठी मदत केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here