इतिहासातील नेत्यांची महत्वाची वाक्ये – Statements from Historical Politicians

0
677

इतिहासातील नेत्यांची महत्वाची वाक्ये – Statements from Historical Politicians

1885 ते 1920 मधील विधाने

  1. जॉन स्ट्रचि- भारतासंबंधी सर्वप्रथम व सर्वात आवश्यक जाणून घेण्यासारखी गोष्ट म्हणजे भारत अस्तित्वात नाही आणि कधीही नव्हता.
  2. बदरुद्दीन तय्यबजी- राणीच्या कोट्यवधी प्रजाजनांमध्ये भारतीय सुशिक्षिता एव्हढे दुसरे कोणी राजभक्त नाही.
  3. आनंद मोहन बोस- सुशिक्षित वर्ग इंग्लंडचा शत्रू नाही उलट त्याच्यासमोर असलेल्या भक्त कार्यात त्याचा नैसर्गिक व आवश्यक सहकारी आहे. 
  4. गो. कृ. गोखले – इंग्रज नोकरशाही कितीही वाईट असो, आज व्यवस्था टिकवून ठेवण्यात फक्त इंग्रजांनाच यश मिळाले आहे आणि व्यवस्थेशिवाय उन्नती शक्य नाही.
  5. लॉर्ड डफरीन- 
    1. काँग्रेस केवळ संकुचित अल्पसंख्य असलेल्यांचे प्रतिनिधित्व करते.
    2. काँग्रेसच्या मागण्या म्हणजे अंधारतील उड्या होय.
  6. लॉर्ड कर्झन – 
    1. काँग्रेस आपल्या विनाशाकडे पडझडत आहे.
    2. काँग्रेसच्या शांततामय मृत्यूत मदत करण्याची इच्छा.
  7. लाला लजपतराय- काँग्रेसच्या मवाळ धोरणाला त्यांनी संधिसाधू चळवळ असे म्हटले.
  8. लोकमान्य टिळक- काँग्रेसला ‘खुशामत खोरांचा मेळावा’ म्हणाले. – अधिवेशन: सुट्टीतील मनोरंजन
  9. लाला लजपतराय- काँग्रेसच्या अधिवेशनाचे वर्णन “सुशिक्षित भारतीयांचा वार्षिक राष्ट्रीय मेळावा.”
  10. लोकमान्य टिळक- वर्षातून एक वेळ आम्ही बेडकसारखे ओरडलो तर आम्हाला काहीच मिळणार नाही.
  11. लालमोहन घोष- लक्षावधी लोक उपाशी मरत असताना जनतेवर जबरदस्त कर लादून एका शासनाने मोठा समारंभ साजरा करणे व त्यावर भरमसाठ खर्च करणे ह्यापेक्षा दुसरी हृद्यशून्यता नाही.
  12. कर्झन – 
    1. भारतीयांच्या चळवळीला हवेचे बुडबुडे म्हटले.
    2. पूर्वेच्या कितीतरी आधी पश्चिमेने ज्ञान मिळवले आहे, पूर्वेकडे लबाडी आणि राजकीय कपट ह्यांनाच जास्त महत्व आहे.
  13. लाला लजपतराय- आम्ही राजमहालाकडून गरिबांच्या झोपड्यांकडे तोंड वळविले आहे. बहिष्कार चळवळी माघे ही मानसिकता, नैतिकता व आत्मिक महत्व आहे.
  14. रामप्रसाद बिस्मिला- इंग्रज साम्राज्याचा नाश व्हावा ही माझी इच्चा आहे.
  15. महात्मा गांधी- 
    1. आमचे मस्तक भगतसिंगांच्या देशभक्ती, साहस, जनतेविषयी प्रेम आणि बलिदानासमोर झुकून जाते.
    2. गांधीजींना लोक सरकारचे भरती अधिकारी म्हणत.
    3. इंग्रजांनो चालते व्हा, भारताला ईश्वराच्या हाती सोपवून द्या, आज भारताचे जे खोटे चित्र दिसत आहे त्याच्या जागी सर्वात चांगला भारत जन्मास येईल.
  16. लाला लजपतराय- काँग्रेस स्थापनेचा विचार डफरीन च्या मेंदूतून उत्पन्न झाला.
  17. जे. आर. सिली- भारताचा उल्लेख हा राष्ट्रीय ऐक्याची भावना नसलेला भौगोलिक प्रदेश असा केला आहे. 
  18.  काँग्रेस ही एक Safty Value आहे- 
    1. लाला लजपतराय
    2. सी. एफ. अँड्रज
    3. रजनी पामदले
    4. गिरीजा मुखर्जी
  19. लोकमान्य टिळक- आपले शब्द एका वृक्षाप्रमाणे आहे, ज्यांचे मूळ म्हणजे स्वराज्य होय, तर त्यांच्या शाखा म्हणजे स्वदेशी व बहिष्कार होय.
  20. लाला लजपतराय- 
    1. ह्युम स्वतंत्रता के पुजारी थे और उनका हृदय भारत की दुर्दशा पर रोता था।
    2. भिक्षेइतका इतर कोणत्याही गोष्टीचा तिरस्कार इंग्रज करत नाहीत, मला वाटते भीक मागणाऱ्यांचा तिरस्कारच करायला हवा. आम्ही भिक्षेकरी नाही हे इंग्रजांना दाखवून दिले पाहिजे.
  21. लोकमान्य टिळक- तुम्ही स्वदेशीचा स्वीकार केला तर परदेशी मालाचा बहिष्कार केलाच पाहिजे.
  22. लॉर्ड मॅकडोनाल्ड – प्लासीच्या लढाईनंतर केलेली सर्वात मोठी चूक (बंगालची फाळणी)
  23. लोकमान्य टिळक- चळवळीचे चटके बसल्याशिवाय ब्रिटिश सत्ता वितळणार नाही.
  24. अरविंद घोष- राजकीय स्वातंत्र्य हा राष्ट्राचा जीवनश्वास आहे.
  25. सर सय्यद अहमद खान- हिंदू मुसलमान म्हणजे सुंदर अशा भारत वधूचे दोन डोळे आहेत.
  26. सुरेंद्रनाथ बॅनर्जी- 1909 चा कायदा हा लोकशाही तत्वाला फासलेला हरताळ आहे.
  27. मोंटेग्यू- बेझंट व टिळक या दोघांनी काँग्रेस पूर्णपणे जिंकली, होमरूल चळवळ ती आता काँग्रेसची होऊन बसली.
  28. लोकमान्य टिळक-
    1.  जर भगवान अस्पृश्यता, जातीभेद मानत असेल तर मी भगवानाला मानणार नाही.
    2. भारत त्या मुलासारखा आहे जो आता जवान झाला आहे, समयसूचकता हीच आहे की आता बापाने त्याला त्याचे जन्मसिद्ध हक्क देऊन टाकावे.
  29. ह्युम- असंघटित लोक कितीही बुद्धिमान आणि उच्च आदर्श बाळगणारे असोत, एकाकी अवस्थेत दुर्बल असताना त्यासाठी गरज आहे संघटन असण्याची.
  30. व्योमेशचंद्र बॅनर्जी- काँग्रेसचा विचार डफरीन च्या मेंदूतून उत्पन्न झाला.
  31. बी पाल(1887)- मी इंग्रजांना एकनिष्ठ आहे कारण माझ्या दृष्टीने ब्रिटिश साम्राज्याप्रति एकनिष्ठ असणे आणि आलेल्या देश व देशवासीयांशी एकनिष्ठ असणे वेगळे नाही.
  32. बंकिमचंद्र चॅटर्जी- काँग्रेसचे लोक पदांसाठी भुकेले असलेले राजकारणी आहेत.
  33. अरविंद घोष
    1. काँग्रेसच्या धोरणाला भेकड असे नाव
    2. काँग्रेस मृत्यूपंथाला लागली असे स्पष्ट

महत्वाची पुस्तके-

म गोविंद रानडे : Essays in Indian Economy (1898)

दादाभाई नौरोजी: Indian Poverty and un British Rule in India (1901)

रमेशचंद्र दल: Economic History of India (1901)

अरविंद घोष: लेख New Lamp for Old I

  1. बंकिमचंद्र चॅटर्जी – मातृभिमीची सेवा, मुख्य संदेश
  2. स्वामी विवेकानंद- भारतीय अध्यात्माने पश्चिम जिंकण्याचे धोरण
  3. स्वामी दयानंद सरस्वती- भारत भारतीयांचा हा नवा संदेश
  4. लोकमान्य टिळक- प्लेग पेक्षा सरकारी प्रयत्न जास्त क्रूर आहेत. – स्वधर्मासाठी स्वराज्य खूप आवश्यक आहे.
  5. बी. पाल- नव्या सुधारणा नव्हे तर पुनर्रचना देशाची मागणी आहे.
  6. लाला लजपतराय- ज्या प्रमाणे गुलामांना आत्मा नसतो त्याप्रमाणे गुलाम असलेल्या जनतेलाही आत्मा नसतो.
  7. लोकमान्य टिळक- आजकाल शहरात पसरलेला प्लेग हा त्याच्या मानवी रुपापेक्षा अधिक दयाळू आहे.
  8. चर्चिल (1942)- ब्रिटिश साम्राज्याच्या विनाशासाठी मी पंतप्रधान झालो नाही.
  9. गांधी- 
    1. क्रिप्स मिशन बाबत-  बुडणाऱ्या बँकेचा पुढील तारखेचा चेक
    2. इंग्रजांनो चालते व्हा.
  10. गोखले-
    1.  मानवता देवात असेल तर दादाभाई नौरोजीच असतील.
    2. दादाभाई नौरोजी यांना भारताचे ग्लॅड्स्टन असे काहीजण म्हणतात.
    3. सरकार गोखलेंना- जहालवादाचे प्रतिनिधित्व करणारे छुपे राजद्रोही म्हणत
    4. मोर्ले गोखलेंना- वाजणारा चिमटा म्हणत.
    5. सरोजिनी नायडू गोखलें बाबत- व्यवहारवादी, परिश्रमी कार्यकर्ता, कल्पनेत रमणारा, दुर्मिळ मिश्रण असणारा असे म्हटले.
  11. व्हेलिंटन चिरोल- 
    1. टिळकांना: भारतीय असंतोषाचे जनक
    2. टिळकांचे ग्रंथ- द आर्टिक होम ऑफ द वेदाज
    3. गीता रहस्य
  12. लाला लजपतराय यांना पंजाब केसरी म्हणतात.
  13. गांधीजींचे लजपतराय यांच्या विषयी वाक्य- भारतीय सुर्यमंडळातून एक तारा अस्तंगत झाला.
  14. गांधीजींनी आदर्श राज्याला रामराज्य म्हटले होते.
  15. अर्नाल्ड टॉयनबी – मानवी इतिहासावर गांधीजींचा प्रभाव हा हिटलर आणि स्टॅलिन पेक्षा चिरस्थायी असेल.
  16. सुभाषचंद्र बोस- 
    1. असहकार चळवळ मागे घेणे म्हणजे देशाचे दुर्भाग्य (नॅशनल क्ल्ँमिटी होय.(1922)
    2. कायदेभंगाची (1930) चळवळ मागे घेणे म्हणजे अपयशाची कबुली होय.
    3. Forward Block- 1947 चे हस्तांतरण हे खोटे हस्तांतरण होते.
  17. सय्यद अहमदखान- हिंदू व मुसलमान हे सुंदर वधूचे दोन डोळे!
  18. सर सय्यद खान- 
    1. भारताचे प्रत्येक नागरिक हिंदू आहे मला खेद आहे की, तुम्ही मला हिंदू मानत नाहीत.
    2. आम्ही मनाने, हृदयाने एक होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आम्ही जर एक झालो तर परस्परांचा आधार बनू. आणि जर एकमेकांचा विरोध करत राहिलो तर आम्हा दोघांचाही नाश होईल.
    3. 1888 नंतर सर सय्यद खान यांच्या विचारांत बदल : हिंदू आणि मुसलमान दोन शब्द आहेत एव्हढेच नाही तर ते विरोधी शब्द आहेत.
  19. वि. दा. सावरकर – हा हिंदूंचा देश आहे, इथे मुसलमानांनी अल्पसंख्याक प्रमाणेच राहिले पाहिजे कारण लोकशाहीत बहुमताची सत्ता असते.
  20. दादाभाई नौरोजी- भारतातील रेल्वे म्हणजे ब्रिटिशांसाठी दुभती गाय होती.
  21. मॉटेग्यू – जालियनवाला बाग हत्याकांडाचा उल्लेख प्रतिबंधात्मक हल्ला असा केला.
  22. मोर्ले – वसाहतीच्या स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी (आकाशातील चंद्र मागण्यासारखे) होय.
  23. बिपीनचंद्र- काँग्रेसची स्थापनेला सुरक्षा झडप सिद्धांताला दंतकथा असे संबोधले.
  24. गोखले- बहिष्कार हे अस्त्र पराकाष्ठेचा उपाय म्हणून राखून ठेवावे.
  25. जवाहरलाल नेहरू- ही एक खेदाची गोष्ट आहे की क्रिस्प सारखी व्यक्तीही स्वतःला सैतानाचा वकील बनू देते.
  26. गांधीजींनी – दिनशॉ वाच्छा यांना पत्राद्वारे- उगवती पिढी केवळ निवेदने इत्यादींनी समाधानी होणार नाही.दहशतवाद संपविण्याचा एकच मार्ग मला दिसतो आहे व तो म्हणजे सत्याग्रह!
  27. सुभाषचंद्र बोस- तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईल.
  28. कर्तारसिंग- जन्मठेपेपेक्षा फासावर जाणे मला अधिक आवडेल, माझ्या मायभूमीस स्वातंत्र्य करण्यासाठी मला पुनर्जन्म मिळावा अशी माझी इच्छा आहे: – फाशी जाण्यासारखा दुसरा आनंद नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here